भारतीय रेल्वेची नवी नियमावली ; बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याचा रेल्वेने घेतला निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ जानेवारी । ट्रेन प्रवास दरम्यान आपले सहप्रवासी अनेकदा जोरजोरात फोनवर बोलत असल्याचा किंवा स्पीकरवर गाणी लावून ऐकत असल्याचा त्रास आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेलच. कर्णकर्कश आवाजातील ती गाणी आणि फोनवरच्या बोलण्यामुळे त्रास होत असतानाही भांडण टाळण्यासाठी आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण यापुढे अशा बेशिस्त प्रवाशांवर कारवाई होऊ शकते. कारण प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी या बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

यासंदर्भात नवी नियमावली रेल्वेने नुकतीच प्रसिद्ध केली असून यामध्ये प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. अनेक प्रवासी लोक फोनवर मोठ्याने बोलतात आणि हेडफोनशिवाय गाणी ऐकत असल्याच्या तक्रारी रेल्वे मंत्रालयाकडे प्राप्त होत असताना या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

रेल्वेने नव्या आदेशात तिकीट तपासनीस, आरपीएफ, कॅटरिंग आणि कोच अटेंडंटसह ऑन-बोर्ड ट्रेन कर्मचार्‍यांना डब्यांमध्ये प्रवेश करण्याचे आणि प्रवाशांना सार्वजनिक शिष्टाचार पाळण्याचे आदेश दिले आहेत. या कामात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना प्रवाशांसोबत विनम्रपणे वागण्याची सूचना करण्यात आली असून तक्रारीला कोणतीही जागा ठेवू नये, असे सांगण्यात आल्याची माहिती माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल असे रेल्वेने यावेळी स्पष्ट केले आहे.

काय आहे भारतीय रेल्वेची नवी नियमावली

आपल्या फोनवर प्रवासी जोरात बोलणार नाही किंवा स्पीकरवर मोठ्याने गाणी ऐकणार नाहीत
प्रवाशांना त्यांच्या फोनवर मोठ्याने न बोलण्याबद्दल तिकीट तपासनीस, रेल्वे कर्मचारी सल्ला देतील.
रात्री १० नंतर ट्रेनमधील रात्रीची लाईट वगळता इतर सर्व लाईट बंद कराव्यात
एकत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्याची परवानगी दिली जाणार नाही.
सहप्रवाशांनी तक्रारी केल्यास अशा प्रवाशांवर कारवाई केली जाईल.
६० वर्षांवरील, दिव्यांग, एकट्या महिला प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सर्व आवश्यक मदत दिली जावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *