आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू, मुख्यमंत्र्यांच्या 10 महत्त्वपूर्ण घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई ;-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यात 144 जमावबंदी कायदा लागू केला आहे.जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.यामुळे राज्यातील रेल्वे, बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहे. सध्या जगाला कोरोनाने (Covid – 19) पोखरायला सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांनी अधिक सावधपणे वागायला हवं.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे –

आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू

*आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे.

* महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.

* रेल्वेसेवा, खासगी बस सेवा, एसटी बससेवा बंद करीत आहोत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील

*अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील, बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील

* शासकीय कार्यालयात आता केवळ 5 टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.

* आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.

* ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून किमान 15 दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.

* चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत., सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा सुरु राहील, पण भाविकांसाठी बंद

* 31 मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर जमावबंदीचा निर्णय घेण्यात येईल

* पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *