विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा : अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असतांना आणि १४४ कलम लागू झालेले असतांना काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत. अशांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

अन्ननागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय शिक्षण, पोलीस, अन्न औषध प्रशासन , नगरविकास विभागाकडून येणाऱ्या देयकांचे पेमेंट तातडीने करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती ही त्यांनी दिली. खाजगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणााऱ्या कामगारांचे वेतन विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असे आवाहन ही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *