महाराष्ट्र २४ ऑनलाईन; नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात टोल नाक्यांमुळे काही प्रमाणात विलंब होत आहे. याची दखल घेत नितीन गडकरी यांनी टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ट्वीट करून त्यांनी यासंबंधीची माहिती दिली.
https://twitter.com
Nitin Gadkari
✔ @nitin_gadkari
/nitin_gadkari/status/1242868196996079616
या निर्णयामुळे अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात होणार विलंब कमी होईल, अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली.