महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । Prakash Ambedkar : महाराष्ट्रात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर. आता ते फक्त आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप प्रत्यारोप राहिले नाहीत, तर अनेक हत्यांचे आरोप होत असून त्याबद्दल एखाद्या पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी वक्तव्य देऊन चालणार नाही…. त्यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून वक्तव्य करावे.. सत्य परिस्थिती समोर आणावी.. एंटेलिया स्फोटक प्रकरण आणि शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांनीच माफीचा साक्षीदार व्हावं. महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव मात्र महिना उलटूनही काँग्रेसकडून प्रतिसाद नाही. असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.