महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ मार्च । बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाने अंदमान आणि निकोबारला धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचं नाव आसनी असं आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील बारा तासांत वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारपासून अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह परिसरात वारा पाऊस सुरू आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कार निकोबारपासून 320 किमी ईशान्येला आणि पोर्ट ब्लेअरच्या 110 किमी अंतरावर ईशान्येला या चकीवादळाचा प्रभाव सुरू झाला आहे. हवामानातील दाब येत्या 12 तासांत आणखी वाढून चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.
Depression over north Andaman Sea and adjoining southeast BoB , about 110 km ENE of Port Blair, 320 km NNE of Car Nicobar .To intensify further into a cyclonic storm in next 12 hrs. To move nearly northwards along & off Andaman towards Myanmar coast in next 48 hrs. pic.twitter.com/5gdlkCX0Uc
— India Meteorological Department (@Indiametdept) March 21, 2022
या चक्रीवादळामुळे प्रचंड पाऊस, वादळ येण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ अंदमान आणि निकोबारच्या दिशेने सरकेल आणि 22 मार्च रोजी बांग्लादेश आणि उत्तर म्यानमारच्या किनाऱ्यांवर पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.