टीम इंडियात परतल्यानंतर दिनेश कार्तिक भावूक; ट्विट करत म्हणाला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ मे । भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी घोषणा केली आहे. टीम इंडियामध्ये तब्बल तीन वर्षानंतर दिनेश कार्तिकचे पुनरागमन होत आहे. दिनेश कार्तिकने ट्विट करून सर्वाच आभार मानत काही मनातल्या गोष्ट सांगितली आहे. आयपीएलमध्ये कार्तिकने चांगली कामगिरी केली आहेत. त्यामुळे त्याला टीम इंडियाचा दरवाज्या उगडला आहे.

टीम इंडिया संघात परत आल्यावर दिनेश कार्तिक म्हणाला, तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला तर सर्व काही ठीक होईल! तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे. मी आजून जिवापाड मेहनत करेल. आयपीएलमध्ये कार्तिकने चांगली कामगिरी केली. आरसीबीसाठी त्याने फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली. आयपीएलमध्ये कार्तिकने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 287 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 57.40 आणि स्ट्राइक रेट 191.3 राहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *