महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ मे । पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर लोणावळ्याहून मुंबईला जाताना पहिल्याच बोगद्यापासून वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी पावणे सात वाजल्यापासून ही वाहतूक थांबलेली आहे. यामुळे वाहनचालक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. परंतु मदतीसाठी एकही वाहतूक पोलिसही रस्त्यावर दिसत नसल्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे मागील काही वेळापासून गाड्यांच्या रांगा लागल्या असून प्रवासी त्रस्त झाले आहे.
दरम्यान, एक्सप्रेस वेवरवरील या घाटात काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रस्त्यावरून एकच वाहन पुढे जात आहे. परिणामी वाहन कोंडी झाल्याचे दिसून येते आहे. या हायवेवरील वाहतूक मंद गतीने वाहतूक सुरू झाली आहे. घाटात काम सुरू असून काही वेळापूर्वी तिथे एक कंटेनर पलटी झाला होता, अशीही माहिती मिळत आहे. आता हा पटली झालेला कंटेनर बाजूला केला असून वाहतूक मंद गतीने सुरू झाली आहे. त्यामुळे चालकांना सुटकेचा निश्वास सोडला आहे.