महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. दरम्यान आजच महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत. या भेटीमध्ये राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होणार आहेत.
भाजपा किंवा शिवसेनेच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर निवडणूक होणारच आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव भाजपा ठेवणार असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडी शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटणार
सकाळी दहा वाजता छगन भुजबळ,अनिल देसाई, सुनील केदार, सतेज पाटील फडणवीस यांची भेट घेणार