महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ जून । विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार की राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे इथंही चुरस रंगणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालाने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न सुरू असले तरी महाविकास आघाडीत परस्परांविषयी निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणानंतर कोणीच माघार घेण्यास तयार नाही. पुरेशी मते नसली तरी दोन्ही जागा लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे. सहाही जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला असला तरी तेवढय़ा मतांचे गणित जुळणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर आज, दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत काही तोडगा निघाला नाही तर ही निवडणूकही राज्यसभेप्रमाणे चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.