दीड वर्षात केंद्र सरकार देणार 10 लाख नोकऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । वाढती महागाई आणि बेरोजगारी दर यातून सर्वांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार ॲक्शन मोड मध्ये दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला. तसेच पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये दहा लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी अशा सूचना देखील त्यांनी सर्व विभाग आणि मंत्र्यालयांना दिले आहेत.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. सत्ताधारी भाजप सरकार विरोधात काँग्रेस पक्षाने देशभरात महागाई आणि बेरोजगारी वरून मोर्चा उघडला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे देखील बेरोजगारी दर वाढत असल्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.

बेरोजगारांसाठी मोठी संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील दीड वर्षातच भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून भारतातील सुमारे दहा लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळं बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *