महाराष्ट्र:-24 । विषेश प्रतिनिधी। आकाश शेळके -पालघरमध्ये चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.या हल्ल्यातील सर्व आरोपींवर कङक कारवाई करण्यात येईल,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.
“पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल.” असे ट्वीट करत मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली.
https://twitter.com/CMOMaharashtra
तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही “हल्ल्यातील 101 आरोपींना अटक करण्यात आली असून चौकशीचे आदेश दिले आहेत तसेच या घटनेचा वापर करून कोणी सामाजिक/जातीय तेढ तर निर्माण करत नाही ना यावर सरकार लक्ष ठेवून असल्याची “माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली.