दिलासा / मराठवाड्यातील 5 जिल्हे कोरोनामुक्त, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोलीत सध्या एकही रुग्ण नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बीड – आकाश शेळके – औरंगाबाद. मराठवाड्यात जालना, औरंगाबाद, परभणी हे तीन जिल्हे वगळता उर्वरित म्हणजे नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली हे चारही जिल्हे सद्य:स्थितीत कोरोनामुक्त आहेत. बीड जिल्ह्यातील एक रुग्ण नगरला उपचार घेत आहे. त्या व्यतिरिक्त बीड जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात रुग्ण नसल्याने त्या अर्थाने बीड जिल्हाही कोरोनामुक्तच आहे.

नांदेड शहरात अद्यापपर्यंत एकही कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. परभणी जिल्ह्यात पुण्याहून आलेला एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. जालना शहरातील दु:खीनगर भागातील ६५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह असून सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. तिचे ४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आठही रुग्ण ठणठणीत झाले असून त्यांना सुटीही देण्यात आली आहे. मुळात हे आठही रुग्ण तेलंगणातील असून त्यांचा संबंध मरकजशी होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे उपचार घेणारे तीनही रुग्ण बरे झाले असून त्यांनाही सुटी मिळाली आहे. हिंगोली शहरातील एका रुग्णालाही सुटी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *