Rain News : राज्यात पुन्हा पाऊस बरसणार : दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून पुन्हा काही ठिकाणी पाऊस सक्रीय झाला आहे. आता हा पाऊस पुढील काही दिवसांपासून सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे ( Weather Update) पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पाऊस बसरणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra weather update: IMD says Konkan Area likely to receive rain)

तर शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे येत्या 6 आणि 7 ऑगस्टला कोकण, गोव्यासह काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या भागात पावसाची शक्यता
राज्यात 4 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, 5 ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

तर 6 ऑगस्टला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या ठिकाणी तर, 7 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *