महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ सप्टेंबर । मी पुण्याचा पालक मंत्री होणार नाही, पुण्याची लोकसभा ही लढवणार नाही, तुम्हाला मी महाराष्ट्रात नकोय का? अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे.आज पुण्यात नोंदणी व मुद्रांक भवनाच्या भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला या सोहळ्यादरम्यान फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलता होते.
फडणवीस म्हणाले, ‘पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता, जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू राज्य सरकार पुढे आज तरी कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र, आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही.
तसंच मुंबईची तिसरी महानगरपालिका (BMC) करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका, आपल्याला विकासाकडे जायचं आहे असं देवेंद्र फडणवीसांनी आज स्पष्ट केलं. काल पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये भाजपनेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणे पालिकेच्या (PMC) विभागणीची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील वक्तव्य केलं.
यावेळी बोलत असताना फडणवीसांना पत्रकारांनी ते लोकसभेत जाण्याच्या चर्चा सुरु आहेत याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी पुण्याचा पालक मंत्री होणार नाही, पुण्याची लोकसभा ही लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का? असा मिश्किल सवाल फडणवीसांनी पत्रकारांना विचारला शिवाय या फक्त माध्यमातील चर्चा असल्याचं देखील फडणवीस म्हणाले.
तसंच यावेळी मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता ते म्हणाले मंत्री मंडळ विस्तार लवकरच होणारं असल्याचं ते म्हणाले. आपली आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट झाली नाही. गणपतीच्या एका ठिकाणी मी पोहोचलो ते पोहोचले मात्र, आमच्या दोघांची भेट झाली नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.