महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । देशातील महागाई दराने आधीच मोठा कहर केला असतानाच रिझर्व्ह बँकेने रेपो रेट पुन्हा वाढवल्याने सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. रेपो रेटच्या दरवाढीमुळे कर्ज महागले असून जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार असल्याने सर्वसामान्य जनतेला चिंतेने घेरले आहे. रिझर्व्ह बँकेने आपला मुख्य कर्जदर म्हणजेच रेपो रेट 50 बेसिस अंकांनी वाढवून 5.90 टक्के केला आहे. या आधी हा दर 5.40 टक्के होता.