महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ ऑक्टोबर । राज्यात काही जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणचे नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. परतीच्या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. मुंबई पुण्यासह शहर परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.
काही ठिकाणी परतीच्या पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून दिलेल्या अंदाजानुसार आजपासूनच परतीचा मान्सून परत फिरणार असल्यामुळे उद्यापासून (15 ऑक्टोबर) राज्यात पावसाची उघडीप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता कमी नाही. मात्र, सध्या पुणे मुंबईसह ठाणे परिसरात ढगाळ वातावरण असून, पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात मागील पाच ते सहा दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर दिसून आला होता.