महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ नोव्हेंबर । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच विविध क्षेत्रामधून राज्यापालांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. तसेच राज्यपालांना हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनीही राज्यपालांच्या त्या विधानाबाबत परखड भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान चुकींच आहे. तसेच मी त्याच्याशी सहमत नाही असे, आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले की, मी राज्यपालांच्या विधानाशी १०० टक्के असहमत आहे. हेतू असो वा नसो, राज्यपालांच्या या विधानाशी मी संपूर्ण असहमत आहे. हे विधान साफ चुकीचं आहे. हे विधान बरोबर नव्हे. देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका मांडली आहे त्यामधून त्यांनीही राज्यपालांच्या विधानाशी संपूर्ण असहमती दर्शवली आहे, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.