![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ फेब्रुवारी । जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये मोठा हिमवर्षाव झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार आहे. आगामी 48 तासांत राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मंगळवारी मोठा हिमवर्षाव झाल्याने त्या भागातील तापमान उणे 8.1 अंशांपर्यंत खाली गेले आहे. जम्मूमधील संपूर्ण गुलमर्ग शहर बर्फाच्छादित झाले आहे. तेथे लोक घरात अडकून पडले आहेत, तर लडाखचे तापमान उणे 14.1 अंशांवर गेले असून, तेथेही मोठा हिमवर्षाव सुरू आहे. याचा प्रभाव राजस्थानवरही झाला असून, तेथे काही भागांत पारा 5 अंशांवर खाली आला आहे. या वातावरणामुळे उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्रात आगामी 48 तासांत येत आहे. दोन दिवसांत राज्यातील पारा घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.