महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मे । नाशिककरांसाठी १ जूनपासून इंडिगो कंपनीकडून इंदूर आणि हैद्राबाद या शहरांकरिता विमानसेवा दिली जाणार आहे. या दोन्ही शहरांसह सध्या सुरू असलेल्या याच कंपनीच्या गोवा, अहमदाबाद, गोवा आणि नागपूर या शहरांकरिताच्या विमानसेवांना कनेक्टेड सेवा १ जूनपासून शहरवासीयांना मिळणार असल्याने भोपाळ, अमृतसर, बंगळुरू, चेन्नर्इ, कोइम्बतूर, देहराडून, कोची, जयपूर, कोलकाता, लखनौ, रांची, तिरुपती, उदयपूर, वाराणसी यांसारख्ये देशातील काही प्रमुख शहरांमध्ये अवघ्या काही तासांत पाेहोचणे शक्य होणार आहे.
इंडिगोकडून दिल्या जाणाऱ्या या कनेक्टेड सेवेमुळे प्रवाशांना नाशिकहून वाराणसीला साडेसहा तासांत तर तिरुपतीला सात तासांत, चेन्नईला सहा तासांत, बंगळुरू आणि चेन्नई, जयपूरला सहा तासांत, भाेपाळला सात तासांत सहज पाेहोचता येणार आहे. विशेष म्हणजे, या कनेक्टेड सेवेकरिता प्रवाशाला एकच तिकीट दिले जाणार असून दैनंदिन ही सेवा उपलब्ध असेल. इंडिगोच्या या विमानसेवेमुळे प्रवाशांना दुसऱ्या माेठ्या शहरात जाऊन तेथून प्रतीक्षा करायची वेळ येणार नाही तसेच तिकिटांसाठीही इतरत्र बुकिंग करण्याची गरज भासणार नाही. देशातील प्रमुख शहरे चार ते सात तासात प्रवाशांना गाठता येणार आहेत.