महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलढाणा – ता. १९ – जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम पेरणीला सुरुवात केली आहे. परंतु बँकांकडून पीककर्ज संथगतीने वाटप करण्यात येत आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व बँक अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाली.
यावेळी बँकांकडून आतापर्यंत फक्त 17 टक्केच पीककर्ज वाटप केल्याने सर्व लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. अशाच प्रकारे पीककर्ज वाटप सुरू राहिल्यास पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यामुळे बँकांनी 30 जून पर्यंत 100 टक्के पीककर्ज वाटप करावे, ज्या बँका 30 जून पर्यंत 100 टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशा सूचना बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यावेळी दिल्या.