कोरोनाची दुसरी लाट आली तर शाळांबाबत फेरविचार करणार ! आमदार बच्चू कडू

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ नोव्हेंबर – मुंबई, ठाणे आणि काही जिल्हे वगळता राज्यात आज पासून (ता. 23) शाळा पुन्हा सुरू होणार आहेत; मात्र दिल्लीमध्ये कोरोनाच्या उद्रेकानंतर राज्यात रुग्णसंख्या वाढली तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो, असे संकेत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत.

राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय 15 दिवसांपूर्वी तत्कालीन परिस्थितीनुसार घेतला होता. त्यासाठी पुरेशी तयारी राज्य सरकारने केली होती; मात्र त्या वेळी कोरोनाची दुसरी लाट येईल, असे वाटले नव्हते; मात्र दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाचा उद्रेक झाला. राज्यातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरी कोरोना लाट आल्यास शाळा सुरू ठेवण्याबद्दल फेरविचार करण्यात येईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेवटी शिक्षण घेता येईल; मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, असही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *