लसीकरणाच्या नावाखाली सायबर हल्ल्यांची भीती; गृहमंत्र्यांनी केलं ‘हे’ आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ जानेवारी-राज्यात प्रत्येक जिल्ह्यात करोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून याचा फायदा सायबर हल्लेखोरांकडून घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी केले.

करोनावर मात करण्यासाठी भारतीय बनावटीच्या दोन लशी देण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली असून, ही मोहीम केंद्रीय यंत्रणेच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारी यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. मात्र सायबर हल्लेखोर या कार्यक्रमाचा दुरुपयोग करण्याची शक्यता असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी ट्वीटरवर माहिती देताना म्हटले आहे.

काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लशीची नोंदणी करण्यासाठी मोबाइलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिनकोड व इतर वैयक्तिक माहिती घेऊन आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, आपली कोणतीही माहिती उघड करू नये, असे गृहमंत्री देशमुख यांनी जनतेला उद्देशून आवाहन केले आहे. जर एखाद्या व्यक्तीला करोना लसीकरणाच्या बाबतीत अशा प्रकारचे फोन आले असतील, तर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी किंवा महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *