Pitru Paksha 2021 : श्राद्धविधी बरोबरच ‘या’ गोष्टींचे पालन अवश्य करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ सप्टेंबर । हिंदू धर्मात, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. या वर्षी पितृ पक्ष २० सप्टेंबरपासून सुरू होत आहे जो पुढील १५ दिवसांसाठी म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत चालेल. या दरम्यान, पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते. दानधर्म केला जातो. असे मानले जाते की पितृपक्षात श्राद्धविधी केल्याने केल्याने त्यांची आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते. श्राद्धविधींबरोबरच पितृपक्षात काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

# पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावे. जर तुम्ही मांसाहार आणि मद्य इत्यादीचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकते.
# पितृ पक्षात श्राद्ध करणाऱ्या घरातील सदस्याने या दिवसात केस आणि नखे कापू नयेत. त्याने ब्रह्मचर्य देखील पाळावे. अर्थात शरीरसंबंध टाळावेत.
# जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे अशुभ मानले जाते.
# पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न दिले पाहिजे. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या स्वरूपात भेटायला येतात.
# प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नका. विशेषतः श्राद्ध पक्षात त्यांना अजिबात दुखवू नका.
# पितृ पक्षात जर केळीच्या पानावर भोजन करा आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करा.
# पितृ पक्षात लग्न, मुंडण, साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये. किंवा नवीन गोष्टींची खरेदी करू नये.
# असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधे जेवण जेवावे. मसालेयुक्त पदार्थ टाळावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *