देशांतर्गत विमान उड्डाणे आता ८५ टक्के प्रवाशांसह

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ सप्टेंबर । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील हवाई वाहतूकीवर निर्बंध लावण्यात आले होते. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाने शनिवारी हवाई वाहतूकीसाठीची प्रवासी क्षमता ७२ टक्क्यांवरून वाढवून ८५ टक्के केली आहे. लॉकडाऊन दरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर २५ मे २०२० रोजी ३३ टक्के क्षमतेसह ऑपरेशन्स सुरू करण्यात आली होती.

प्रवाशांच्या मागणीनुसार अनुसूचित देशांतर्ग वाहतुकीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारत्या नागरी उड्डयन मंत्रालयाने २१ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार दिलेल्या अटी, १२ ऑगस्ट २०२१ रोजी शिथील करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिकृत अधिसुचना जाहीर करुन ७२.५ टक्के क्षमता वाढवून ती आता ८५ टक्के करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर २५ मे २०२० रोजी ३३ टक्के क्षमतेसह ऑपरेशन्स सुरू करण्यात आली होती. मंत्रालयाने विमान कंपन्यांना ३३ टक्के प्रवासी क्षमतेसह वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. डिसेंबर २०२० पर्यंत हळूहळू ही मर्यादा ८० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. १ जून, २०२१ रोजी पुन्हा एकदा संख्या ५० टक्क्यांवर आणण्यात आली, त्यानंतर ५ जूनला वाढवून ६५ टक्के करण्यात आली. १२ ऑगस्टला दिलेल्या शेवटच्या आदेशानुसार ७२.५ टक्के करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रवासी क्षमता ८५ टक्के करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *