महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ जानेवारी । अनेकांची आजच्या फास्ट लाईफमुळे आणि चिंताग्रस्त जीवनामुळे तरुणपणीच केस गळतात. केस गळण्याचे प्रमाण योग्य आहार न मिळणे, वेळेवर जेवण न करणं, फास्ट फूड, क्षारयुक्त पाण्याचा वापर, हार्मोन्समध्ये बदल, पित्तदोष, अती मसालेदार पदार्थांचं सेवन, अनुवांशिकता अशा विविध समस्येमुळे वाढते. पण यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे असंतुलीत आहार. असंतुलीत आहारामुळे केस गळण्याचे प्रमाण जास्त आहे. सौदर्यात केस गळल्यास बाधा येते. तसेच माणूस तरुणपणीच वयस्कर वाटू लागतो. त्यामुळे डोक्यावर काळभोर, दाट केस सर्वांनाच हवे असते. केसांमुळे व्यक्तीमत्व फुलून दिसते. त्यामुळे केस जर गळत असेल तर त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
रताळू: केसांच्या आरोग्यासाठी विटॅमिन आणि बीटा कॅरोटिनने भरपूर रताळू हे सर्वात उत्तम पर्याय आहे.
पालक: आयरन आणि फोलेटचा उत्तम स्रोत असून केसांच्या विकासासाठी पालक फारच फायदेशीर असतो. त्याच बरोबर फोलेट लाल रक्त कौशिकांचा निर्माण करण्यास मदत करतो, जो केसांपर्यंत जाऊन केसांना ऑक्सिजन पोहोचवतो. जेवणात पालकाला सॅलाडच्या रूपात देखील घेऊ शकता.
शिमला मिरची: विटॅमिन सी ने भरपूर लाल, पिवळी आणि हिरव्या रंगांमध्ये मिळणा-या शिमला मिरच्या असतात, केसांच्या आरोग्यासाठी जे फार जरूरी आहे. केसांमध्ये कोरडेपणा विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे येतो आणि लवकरच ते तुटू लागतात.
मसुरची डाळ: शाकाहारी लोकांसाठी टोफू, सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटार आयरनाने भरपूर प्रोटिनाचे महत्त्वपूर्ण सोर्स आहे. ये सर्व पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी फारच गरजेचे आहे.