Heavy rain warning in Maharashtra : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, या ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी राज्यात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अद्याप पावसाने दडी मारलेली दिसून येत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. काही ठिकाणी अद्याप पेरणी करण्यात आलेली नाही. तर काही ठिकाणी पाणीटंचाईची समस्या कायम आहे. आता जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकण भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील 5 दिवसात राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारा देण्यात आला आहे. कोकणात ऑरेंज असणार आहे. तर ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

तर मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर येथे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर येथेही चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

मराठवाडामधील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली येथे पाऊस होईल. तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *