Sharad Pawar on Team India: शरद पवारांनी सांगितला पाकिस्तानात घडलेला ‘तो’ किस्सा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (४ फेब्रुवारी) रोजी झालेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तान भेटीची आठवण झाली. ही गोष्ट आहे त्या दिवसांची जेव्हा ते बीसीसीआयचे अध्यक्ष होते. मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधित करताना त्यांनी आपल्या पाकिस्तान, विशेषतः कराची भेटीच्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत क्रिकेट मालिकेत सहभागी होण्यासाठी ते पाकिस्तानला गेला होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते पाकिस्तानी लोकांना कसे भेटले, त्यांच्यासोबतचे अनुभव कसे यावर सविस्तर सांगितले.

शरद पवार म्हणाले, “मी एकदा एक गोष्ट बोललो होतो तेव्हा मीडिया माझ्या मागे लागला होता. मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना एकदा भारत आणि पाकिस्तानचा सामना तिथे होणार होता. खरे सांगायचे तर, त्यावेळी भारत सरकारकडून पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी कोणतीही परवानगी नव्हती. तेव्हा मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे तरुणांना खेळण्याची संधी देण्याची विनंती केली. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी परवानगी दिली.”

धर्मावरून राजकारण न करण्याचे शरद पवार यांचे आवाहन
पाकिस्तानातील उदाहरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील सर्व राजकीय नेत्यांना धर्मावरुन राजकारण न करण्याचं आवाहन केलं. “धर्मावरुन राज्य आणि देशात जे राजकारण केलं जातं त्यामुळे देशाची प्रगती खुंटते”, असं शरद पवार म्हणाले. मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानात त्यांना आलेल्या अनुभवाचा किस्सा सांगितला. “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असताना आपण टीम इंडियासोबत पाकिस्तानला गेलो होतो. त्यावेळी तिथल्या नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद हा चांगला होता. सगळे आदराने, सौजन्याने वागायचे,” असं पवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला आपल्या देशातील आत्ताची परिस्थिती पाहून खूप दुःख होतं. आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे, भाषांचे लोक राहतात. सर्वांमध्ये एकोप्याचे संबंध असले पाहिजेत. एकात्मता आणि प्रेम असलं पाहिजे. पण धर्म नावावर राजकारण करणारे लोक समजात विद्वेष पसरवत आहेत”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी आपली व्यक्त केली.

टीम इंडियाने कराचीला भेट देण्याची मागणी केली तेव्हा…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष पुढे म्हणाले, “तेव्हा खेळाडूंनी मला सांगितले, आम्हाला कराचीला जायचे आहे. आम्ही हॉटेल सोडल. एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. पैसे देण्यासाठी तो काउंटरवर पोहोचला असता हॉटेल मालकाने पैसे घेणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की तुम्ही आमचे पाहुणे आहात.”

आम्ही म्हणत राहिलो, पण त्याने आमचे ऐकले नाही…
शरद पवार पुढे म्हणाले, “ते लोकं म्हणाले, टीव्हीवर दिसणारे खेळाडू कराचीला आले आहेत. आम्ही पाहुण्यांकडून पैसे घेत नाही. आम्ही खूप आग्रह केला पण त्याने शेवटपर्यंत पैसे घेतले नाहीत.” पुढे ते म्हणाले की, “कुणाची मावशी, कोणाची आजी, कोणाचे काका इथे पाकिस्तानात आहेत त्यांचे काही नातेवाईक भारतात देखील आहेत. क्रिकेटमुळे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेत जायचे भाग्य मला लाभले. पाकिस्तान आणि बांगलादेशातील लोकही भारतात येण्यास उत्सुक असल्याचे मला आढळून आले. त्यांचे काही नातेवाईक येथे राहतात. सर्वसामान्यांच्या मनात भारताबद्दल द्वेष नाही. राजकारणाशी संबंधित लोकांमध्ये द्वेष आणि दुरावा आहे. सर्वसामान्यांमध्ये एकमेकांबद्दल पुरेसे प्रेम आणि आदर आहे.” असाही एक त्यांनी किस्सा सांगितला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *