शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरेंनी काय मागितलं होतं ? मी साक्षीदार आहे एकनाथ शिंदेंचं विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २० मार्च । रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड येथील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या हातानेच स्वत:चा पक्ष कसा संपवला? याची अनेक कारणं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून सांगितली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासह आपल्याला पक्षातून बाहेर का पडावं लागलं? यावरून एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला.

आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरे काय मागत होते? जिथे शिवसेना नाही. जिथे शिवसेना कमजोर आहे, तो भाग मला द्या. मी शिवसेना वाढवतो आणि मोठी करतो. नारायण राणेंचा काय गुन्हा आहे? त्यांच्या बाबतीत काय झालं? राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? याचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत. आता तर आम्हाला सगळे भेटतात, आमच्याशी बोलतात. पूर्वी आमच्यावर बंधनं होती. आता आम्ही मोकळे आहोत. आमच्यात विचारांचं अदान प्रदान होतं, असं विधान एकनाथ शिंदेंनी केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *