‘या’ एका कारणामुळं शिंदे गट, ठाकरे गट एकत्र येण अशक्य; भुजबळांचं मोठं वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ एप्रिल । अदानी प्रकरणात जेपीसी नियुक्त करण्याची आवश्यकता नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. आता शरद पवार यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी देखील समर्थन केलं आहे. आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करू नये. आपली बदनामी होता कामा नये असं छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी भविष्यात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाची युती होऊ शकते का? यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हटलं भुजबळांनी?
छगन भुजबळ यांनी देखील जेपीसीवर प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांचं समर्थन केलं आहे. आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करू नये. आपली बदनामी होता कामा नये. टाटा बिर्ला यांनी देखील खूप चांगलं काम केलं आहे. पवारांचं म्हणण आहे की, उद्योगपतींच्या बाबतीत कुठपर्यंत ताणून धरायचं. इतरही अनेक मुद्दे आहेत त्यावर चर्चा झाली पाहिजे, असं छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट युती होणार का या प्रश्नावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात फडतूस, काडतूस अशी वक्तव्य होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतील असं वाटत नसल्याचं छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *