महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुन । सध्या पगार काही वाढत नाही पण महागाई मात्र झपाट्याने वाढते अशी स्थिती आहे. अगदी स्वयंपाक घरातील किराणापासून ते अत्यावश्यक सेवांपर्यंत सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत. आता त्यात भरीला भाज्यांचे दरही दुपटीने वाढल्याने गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.इतरही भाजीपाला २० रुपयांनी महाग झाला आहे. तर दुसरीकडे कांदे, बटाट्याचे दर उतरल्याने प्रत्येक भाजीत त्याचा पुरेपुर वापर करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. टोमॅटोचे दर दोन दिवसांमध्ये दुपटीपेक्षा जास्त, बारीक हिरवी मिरची 30 रुपये किलोने महाग झाली आहे.
आठवड्यापूर्वी खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड थांबवली आहे. त्यात उष्णतेचा तडाखा, मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळाने तडाखा दिल्याने उत्पादनावर परिणाम होऊन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली. परिणामी हिरव्या पालेभाज्यांचे दर 60 ते 80 रुपये किलोवर पोहोचले आहेत.
सध्या बाजारात बऱ्यापैकी आवक आहे. पण, पहिला दमदार पाऊस झाल्यानंतर आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वाढतील. साधारण ऑगस्ट महिन्यात पुन्हा आवक वाढल्यानंतर हे दर कमी होतील. आताही भाव जास्त असल्याने भाजीपाला विक्रीवर परिणाम कोथिंबीर दीड ते दोन झाला आहे. त्यामुळे अनेक ग्राहक मोजकी खरेदी करावी लागते.